झाली कधीच पिवळी
पाने आशेची कोवळी
नको देऊ आता पाणी
नाही फुलणार कळी
जेव्हा फुलायचे होते
तेव्हा झुलविले तूच
मला हसायचे होते
तेव्हा रडविले तूच
फार उशिरा तू आला
वेड्या, बहर संपला
कळी कोमेजून गेली
मुग्ध सुगंध लोपला
सारा उडेल पाचोळा
नको होऊस तू वारा
तुझी फुंकरही आता
मला वादळाचा मारा!



1 comment:
Post a Comment